Uncategorized

क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन संपन्न

  1. जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)– अमृतेश्वर मठ संस्थान जिंतूर येथे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 894 व्या जयंती सोहळ्याचे भव्य दिव्य नियोजन अखिल भारतीय युवक शिवा संघटना व समस्त वीरशैव लिंगायत समाज जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उदघाटन मा. ना. मेघनादीदी बोर्डीकर राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी यांच्या हस्ते झाले. वीरशैव समाजाच्या वतीने आयोजित मागच्या वर्षीच्या जयंती ला दिलेले सर्व आश्वासने एका वर्षात पूर्ण केली. जिंतूर शहरात लवकरच महात्मा बसवेश्वर यांच्या संकल्पनेतील अनुभव मंडपम चे काम पूर्ण होणार आहे तसेच महात्मा बसवेश्वरांचे भव्य दिव्य स्मारक उभारलं जाणार आहे.जिंतूर सेलूच्या वीरशैव बांधवांच्या सर्व समश्या लवकरच सोडवन्यात येतील असे आश्वाशीत केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मनोहर धोंडे सर राष्ट्रीय अध्यक्ष, शिवा संघटना हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. धन्यकुमार शिवणकर( राज्य सरचिटणीस शिवा संघटना), प्रतापभैय्या देशमुख (मा. नगराध्यक्ष जिंतूर ), मा. रमेशजी दरगड (अध्यक्ष, व्यापारी महासंघ जिंतूर ), श्री राहुलभैय्या देशमुख, श्री इंद्रजित घाटुळ, श्री. बालाजी सांगळे हे उपस्थित होते.
श्री श्री श्री. ष. भ्र. 108अमृतेश्वर शिवाचार्य महाराज, जिंतूर आणि श्री श्री श्री ष भ्र 108 शिवचैतन्य शिवाचार्य महाराज हदगाव यांनी आपल्या प्रवचनातूनसमाजाला महात्मा बसवेश्वरांच्या सिद्धांतावर चालण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप लकडे यांनी केले तर प्रभू अप्पा वाघीकर, मनोज तोडकर यांनी समाजाची भूमिका मांडली. श्रो. प्रतापराव देशमुख यांनी जिंतूर शहरातील समशा सोडविण्यासाठी मी सदैव आपल्या सेवेत राहील असे आश्वासन दिले. त्या नंतर मा मनोहर धोंडे सर यांनी अध्यक्षीय समारोप केला. त्यांनी वीरशैव समाजाच्या विविध मागण्यासाठी लवकरच आंदोलन करण्यात येईल असे नमूद केले. महात्मा बसवेश्वर यांची जयंती संपूर्ण भारतात साजरी केली जावी अशी मागणी मा. पंतप्रधान मोदीजी यांना केली.
महात्मा बसवेश्वर जयंती यशस्वी करण्यासाठी सोहळ्याचे मुख्य संयोजक मा. प्रभाकर पाटील वाघीकर( माजी उपाध्यक्ष जी. प. परभणी), स्वागताध्यक्ष मा. संदीप अप्पा लकडे (संचालक कृ. उ. बा. समिती जिंतूर तथा सरपंच येसेगाव ),जयंती अध्यक्ष मा. विजय फरतखाणे (ओ. एस. डी.पालकमंत्री परभणी ), कार्याध्यक्ष मा. भारत अप्पा महाजन,मा. शिवा अप्पा मुलंगे, मा. शिवा अप्पा लकडे, प्रदीप अकोशे, सचिव मा.नागेश अप्पा तडकसे, सरचिटणीस मा.विलास भंडारी(शहर अध्यक्ष भा. ज. पा. जिंतूर )तर जयंतीचे मुख्य मारदर्शक म्हणून मा. मनोज अप्पा तोडकर, उपाध्यक्ष मा. अक्षय बारहाते, कोषाध्यक्ष श्री सोमनाथ अप्पा घळे, सह कोषाध्यक्ष श्री गजानन धारूरकर, प्रसिद्धी प्रमुख रमेश संगेकर, सह सचिव महेश मुलंगे, मा. गंगाधर अप्पा तरटे(सरपंच, वडाळी), मा. सतीश अप्पा बरडे (सरपंच, बामणी)मा. नवनाथ मेनकुदळे (उपसरपंच, इटोली), राहुल भालेराव (उपसरपंच गडदगव्हाण)तसेच संदीप चवरे, प्रभू अप्पा सावरगावकर, दीपक फाले,शिवाजी हळदे , शिवम दसमले, मंदार घळे,आकाश लकडे
महेश बेले,मनोज गाढवे, अमोल अजुरे
कृष्णा फाले, अक्षय आंबटवार यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. रमेशजी तरटे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button