पावसाळ्यापूर्वीच महावितरणाची झाली पोलखोल
अकोली येथील वीज कोसळून एक बैल दगावला:शेतकरी हतबल:शहरात रात्रभर विजेचा लपंडाव सुरू

@जिंतुरात विजेच्या कडकडासह पावसाची जोरदार बॅटिंग
@ पावसाळ्यापूर्वीच पावसाने महावितरणाची केली पोलखोल:वादळी पावसामुळे विद्युत पुरवठा खोळंबला
@ वादळी वाऱ्यात वृक्ष कोसळून वाहनांचे नुकसान@ महावितरणचे विद्युत पोल कोसळल्याने शहर अंधारात
@ अकोली येथे वीज कोसळून एक बैल दगावला
जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)–
येथे विजेच्या कडकडा सह जोरदार वादळी वारे व पाऊस कोसळल्याने महावितरणचे पोल व केबल तूटले असून शहरात सर्वत्र अंधार व अनेक ठिकाणी वृक्ष मोटार सायकल व ॲटो रिक्षा वर उन्मळून पडल्याने आर्थिक नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे सुद्धा नुकसान मोठ्या प्रमानात झाले.
सध्या शहरासह सबंध तालुक्यात अवकाळी अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू झालेला असून रात्री आज नऊ वाजेपर्यंत शहरातली बीज गुल झालेली दिसून आले या सर्व प्रकरणामुळे महावितरणाचा गलथान कारभार समोर आलेला असून शहरवासी महावितरणाच्या या गलथान कारभारामुळे जाम वैतागले आहेत.
पावसाळ्यापूर्वीच महावितरणाची ही अवस्था असेल तर वर पावसाळ्यात वीस सेवा सुरळीत राहील का असा प्रश्न नागरिकापुढे उभा राहिलेला दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे रात्रीचा दररोज विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून या अंधाराचा फायदा घेऊन शहरात चोरटे सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाळ्यापूर्वीच महावितरण विभागाने शहरासह संबंध तालुक्यातील विद्युत यंत्रणा सुरळीत करून पुढे पावसाळ्यात विद्युत पुरवठा पळवणार नाही यासाठी लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी तुझ्या नागरिकांतून मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शहरातील दळण व्यवस्था कोसळली आहे.
चौकट
आज जिंतूर शहरात साडेचार ते साडेपाच अशा एक तासात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली होती. या पावसात जोरदार वादळी वारे सुटल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी पावसासह विजेचा कडकडाट ही मोठ्या प्रमाणात दिसून आला यावर्षी पावसाळ्यापूर्वीच वीज अंगावर पडून तालुक्यातील पिपरी रोहीला येथील एका तरुण शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच आज तालुक्यातील अकोली शिवारात शेतकरी मुंजाभाऊ रोकडे या शेतकऱ्यांचा वीज पडून पडून एक शेती उपयुक्त बैल दगावल्याने शेतकऱ्यांचे पेरणीपूर्वीच बैल दगावल्याने नुकसानग्रस्त शेतकरी हतबल झाला आहे.शेतकऱ्यास शासनाने तत्काळ आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.