Uncategorized

ऑपरेशन सिंदूरचे भाजपकडून जल्लोषात स्वागत

जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)—देशाच्या पहेलगाम मध्ये पाक दहशत वाद्यांनी 27 भारतीय पर्यटकांना अमानुष नरसंहार करून ठार केले होते.या घटनेने सबंध देशात पाकच्या दहशद वाद्यांच्या विरोधात असंतोष भडकला होता.या घटनेचा बदला घेण्यासाठी भारताने “ऑपरेशन सिंदूर” माध्यमातून पाक मध्ये आश्रयास असलेले पाक कडून पोसले जाणाऱ्या पीओके पाक मध्ये नऊ ठिकाणी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारता कडून हवाई हल्ले करून दहशत वाद्यांचे अड्डे उध्दवस्त केले.

पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या मार्गदर्शनात या पराक्रमाचे जल्लोषात स्वागत भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यानी  मोठ्या जल्लोषात केले.या वेळी डॉ.पंडित दराडे,विलास भंडारे,ऍड.सुनील मते, खेत्रे आबा,अक्षय सूर्यवंशी,रमेश संगेकर, गुज्जर मोहिते,गुलाब नेटके, अमृत इटलीकर, सदाशिव गुळवे, शुभम कोरडे, पवन स्वामी, शेख मझहर, अर्जुन गरड, आदिनाथ गिरी, देशमुख पुंगळेकर आदी हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button