“पाकिस्तान मुर्दाबाद”च्या घोषणा देत पहेलगाम हत्याकांडाचा निषेध
जिंतूरात मुस्लिम बांधवानी कँडल मोर्चा काढून केला निषेध

जिंतूर–गुणीरत्न वाकोडे)–काश्मीर मधील पहेलगाम येथे अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करत 28 निरपराध पर्यटकांना ठार मारले या घटनेच्या निषेधार्त शहरातील मुस्लिम बांधवानी शुक्रवार दि 25 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता एकत्र येत कँडल मार्च काढत अतिरेकी हल्ल्याचा व पाकिस्तान चा निषेध करून मृतांना श्रध्दांजली वाहिली
या बाबत तहसीलदार राजेश सरवदे यांच्या मार्फत पंतप्रधानांना पाठवलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व पर्यटक व काश्मिरी नागरिकांना प्रत्येकी 50 लाख रु आर्थिक मदत देण्यात यावी.या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येऊन दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात यावे जेणे करून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत किंवा असे करण्याची कोणाची हिंम्मत होणार नाही.पाकिस्तान मधील दहशतवादी अड्ड्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात यावे.पाक खेळाडू,गायक,कलाकार, नागरिकांना भारतीय व्हिसा नाकारण्यात यावा. तसेच संयुक्त राष्ट्रसंघात या बाबत आवाज उठवून कडक निर्बंध लादण्यात यावे.आर्थिक व्यापारावर बंदी घालण्यात यावी या सहा अनेक मागण्याचा समावेश आहे
शहरातील दादा शरीफ चौकातून सकल मुस्लिम तरुणांच्या वतीने पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद मुरदाबाद,हिंदू मुस्लिम भाई भाई च्या घोषणा देत मुख्य चौक,पोलीस स्थानक,छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याने बस स्थनाका समोरील शहीद अब्दुल हमीद चौका पर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. या ठिकाणी एड. शोएब सिद्दीकी, सुलेमान काझी, डॉ इरफान अगाई पटेल यांनी उपस्थित तरुणांना संबोधित करून हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी टिपू सुलतान ब्रिगेड, माजी नगरसेवकांनी परिश्रम घेतले.