Uncategorized

जिंतूर नगर परिषदेच्या प्लास्टिक बंदी मोहिमेत महिला गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते लागले कामाला

जिंतूर —-(गुणीरत्न वाकोडे)– केद्र शासनाच्या पर्यावरण वन व हवामान परिवर्तन मंत्रालय्द्वारे पर्यावरण सरंक्षण अधिनियम, १९८० ला अनुसरून प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ ,अधिसूचित करण्यात आले आहेत .

यामध्ये एकल वापर प्लास्टिक वस्तूंना प्रतिबंधत करण्याकरिता ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या आणि ३१ डिसेंबर२०२२ पासून १२० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅगवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे .तसेच महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र विघटनशील –अविघटनशील कचरा (नियंत्रण )२००६ ला अनुसरून महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन , वापर ,विक्री ,वाहतूक, हाताळणी,साठवणूक)निगमन तरतुदी अन्वये राज्यात विविध प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी लागू करण्याकरिता जिंतूर नगरपरिषचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते हे जिंतूर नगरपरीषद क्षेत्रात प्लॉस्टीक कॅरीबॅग चा वापर बंद होण्यासाठी जनजागृती करण्यासाठी बचत गटांच्या महिलांना आवाहान केले, त्यानुसार शहरातील बचत गटांनी चांगला प्रतिसाद दिला
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी शहरामध्ये सुरु करण्यात आली असून जिंतूर शहरातील राजश्री शाहू महिला बचत गट (अध्यक्ष)अंकिता प्रधान,सुकेशनी प्रधान (उपाध्यक्ष) तसेच समृद्धी महिला बचत गटामधील सुनिता पाटील (अध्यक्ष) सीमा वाकळे (उपाध्यक्ष) यांच्या सह गटातील इतर महिलांनी मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला व व्यापाऱ्याना , नागरीकांना प्लॉस्टीक कॅरीबॅग मुळे पर्यावरण, प्राणीमात्रांना या पासुन होणारे नुकसान टाळण्यासाठी सर्वानीच प्लॉस्टिक कॅरीबॅग चा वापर करू नये म्हणून शहरात जनजागृती केली आहे या मोहीमेत मुख्याधिकारी मेनिनाथ दंडवते, अशोक जगताप ( प्रकल्प अधिकारी) आरती देशपांडे( शहर समन्वय) इत्यादी मार्गदर्शन केले असे आमचे प्रतिनिधी कळवितात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button