भाजप तर्फे हज यात्रे करूंचा सत्कार संपन्न
हिंदू-मुस्लिम एकता हीच देशाची ताकद व अखंडता--माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख

जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)-आज दिनांक २० मे २०२५ रोजी सकाळी ११ वा . जिंतूर तालूक्यातील हज यात्रेला जाणाऱ्या एकूण ३२ लोकाचा सत्कार समारंभ टि. जे. फग्शन हॉल जिंतूर येथे पार पडला आहे.
हा कार्यक्रम राज्याचा पालकमंत्री सौ मेघना बोर्डीकर यांचा मार्गदर्शनात मध्ये घेण्यात आला.
मुस्लीम समाजातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी नगर अध्यक्ष प्रताप विनायकराव देशमुख हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हापरिषद अध्यक्ष प्रसादराव बुधवंत,गोवीद थिटे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड,पिंटू चव्हाण,विलास भंडारे,मौलाना तजमुल अहेमद,मौ. मिर्झा कलीमबेग, मौ गुलाम रसुल, इत्यादी उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांनी आपआपले मोलाचे विचार मांडले.
व अध्यशीय भाषणात प्रताप भैय्या देशमुख यांनी देशातील हिंदू-मुस्लिम बांधवाची एकता ही भारत देशाची जगापुढे मोठी ताकद व आदर्श आहे.समाजात एकता राहावी व भारत देशात सर्व सामाजील लोकांनी गुण्या गोविंदाने एकत्र राहावे,व एकीचे वातावरण निर्माण व्हावे या साठी असे कार्यक्रम घेवून समाजात एकता निर्माण होईल असे मोलचे विचार त्यांनी मांडले, व हज यात्रेला जाणाऱ्या सर्व मुस्लिम बाधवांनी देशात शांतता,बधुभाव राहावा या साठी प्रार्थना करावी अशी विनंती केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद फेरोज भाई, रहेमान भाई लाडले, शहेजाद खाँन, मज्जू मिर्झा, मुखीद इत्यादीनी परिश्रम घेतले होते.