जिंतूरात तिरंगा रॅलीस अभुतपूर्व प्रतिसाद!!!
रॅलीत राजमुद्रा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग: स्वातंत्र्य सेनानी देशप्रेमी महिला,पुरुष व युवक युतींचाही सहभाग

जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)–देशाचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर पाक व्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले.
भारतीय पर्यटकावर झालेल्या हल्ल्याचा बदला शन सिंदूरच्या माध्यमातून घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय सैनिक यांच्या गौरवार्थ आज जिंतूर शहरांमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन राज्यमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी शहरातील महिला,भगिनी,बालगोपाल,स्वातंत्र्य सेनानी व देश प्रेमी लोकांचा मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या तिरंगा रॅलीत प्रो.रोहन गायकवाड यांच्या राजमुद्रा अकॅडमीचाही मोठ्या प्रमाणात गणवेश धारण करून सहभाग नोंदविला होता.
या तिरंगा रॅलीच्या आयोजना साठी अगोदर पासूनच तालुक्यात बॅनर बाजी,ध्वनिप्रक्षेपन,करून योग्य असे वातावरण करण्यात आलेले होते.भारताने केलेल्या प्याकव्याप्त असलेल्या अतिरेक्यांचे अड्डे उध्दवस्त केल्यानंतर सबंध देशात विशेषतः हिंदू-मुस्लिम सह सर्वजातीधर्मात एकी दिसून आली.सबंध देश शूरवीर सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून आले.आणि जागोजागी निघणाऱ्या तिरंगा रॅली मुळे देशा बद्दलची एकीची अखंडतता दिसून आली.
या तिरंगा रॅलीच्या यशस्वीतेसाठी डॉ.पंडित दराडे, गोविंद थिटे,माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख,महेश चैत्यन्य महाराज,संदीप शर्मा महाराज (ईटोलीकर) प्रतिष्ठित व्यापारी ब्रिजगोपाल तोष्णीवाल,व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष रमेश दरगड,प्रसाद बुधवंत,मुसाभाई कुरेशी,आत्माराम पवार,भाजप शहर मंडळ अध्यक्ष विलास भंडारे,सुनील मते,प्रदीप देशमुख,सचिन रायपत्रेवार,लक्ष्मण ईलग,रेहमान भाई,चंद्रकात बहिरट,आदींनी अथक परिश्रम घेतले.