जिंतूर–येलदरी रस्त्यांच्या दुरुस्ती साठी तिरडी आंदोलन
रस्त्यांच्या मागणी साठी नागरिकांत तीव्र संताप

जिंतूर-येलदरी रस्त्याच्या दुरवस्थेवरून नागरिकांचा संताप;
तिरडी यात्रा काढून सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे करण्याचा प्रयत्न
जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)–जिंतूर—येलदरी रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे वैतागलेल्या स्थानिक नागरिकांनी दिनांक २८ मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले नागरिकांनी तिरडी यात्रा काढत विभागाला ‘जागं’ करण्याचा प्रयत्न केला.विशेष म्हणजे,या आंदोलनात तृतीयपंथीयांचा देखील उत्स्फूर्त सहभाग होता.
विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे शिवाय जिंतूर तालुक्यातील अनेक गावांना जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे मात्र मागील काही दिवसांपासून रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता अशी अवस्था झाली सध्या वाहनधारकांना अपघाताचा धोका रोजचाच झाला आहे. पावसाळा सुरू असल्याने खड्यात पाणी साचत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प होण्याची शक्यता आहे.या रस्त्यावरून शाळकरी मुले,रुग्ण आणि शेतकरी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे म्हणून नागरिकांनी एकत्र येत अनोख्या तिरडी यात्रेत नागरिकांनी “सार्वजनिक बांधकाम विभाग – RIP”, “रस्ता मरेपर्यंत प्रतीक्षा करू नका” अशा फलकांसह रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तिरडी यात्रा काढली विशेष म्हणजे तिरडी यात्रेत तृतीयपंथीयांनी देखील या आंदोलनात सामील झाले होते
आगामी काळात प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास पुढील काळात रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अँड माधव दाभाडे, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष प्रितम वाकळे,दामू नवले,गजानन वाघमारे,योगेश हुलगुंडे,अभिषेक चव्हाण,ऋषिकेश चव्हाण,द्यानेश्वर काकडे,प्रदीप गायकवाड,पवन काकडे,संतोष नवले,अनिल गाडेकर,किशोर मोरे आदीजन आंदोलनात सहभागी होते.
@@जिंतूर यलदरी खराब रस्त्यावर भिक मागून उदरनिर्वाह करतो परंतु खराब रस्त्यामुळे आमच्यासमोर अनेक अपघात झाले आहेत त्यात अनेकांचा मृत्यू झाला तर काही जण अपंग झाले आहेत म्हणून आम्ही तिरडी आंदोलनात सहभागी झाले आहेत.@@
— संजना जाधव (तृतीयपंथी)
@@ सार्वजनिक बांधकाम विभागाचे आंदोलकांना लेखीपत्र दिले असून रस्त्याचे काम काम मंजूर आहेत ते लवकरच चालू होईल व सध्या रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे कळवले आहे.@@