घरांच्या नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्या-बाळासाहेब भांबळे
स्थानिक प्रशासनास दिले लेखी निवेदन

जिंतूरा–(गुणीरत्न वाकोडे)– वादळी वाऱ्या सह अवकाळी पावसने शहरातील असंख्य प्रभागात घरांची पडझड झालेली असून अश्या नुकसान ग्रस्ताना तत्काळ स्थानिक प्रशासनने आर्थिक मदतीची मागजी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
याविषयी सविस्तर माहिती असे की 20 जून रोजी जिंतूर शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शहरास झोडपून काढले. या आलेल्या अवकाळी मान्सूनपूर्व आसमानी संकटामुळे शहरातील असंख्य प्रभागात बहुसंख्य घराची पडझड झालेली असून पावसाळ्यापूर्वीच या अवकाळी वादळी पावसाने शहरातील असंख्य घरांची पडझड झालेली दिसून येत आहे.
वादळी वाऱ्या सह अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील असंख्य भागात नागरी वस्त्यात व घरादारात पाणी शिरले.या जोरदार पावसाच्या बॅटींग मुळे असंख्य घराची छपरे,पत्रे उडून गेली.तर संततधार पावसाने झोडपून काढल्याने कित्येक घरांच्या भिंती पडल्या.काही घरावर जोरदार वादळी वाऱ्या मुळे मोठमोठी वृक्ष घरावरील पडल्याने कित्येक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या सर्व वादळी पावसा मुळे नुकसान ग्रस्त नागकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तत्काळ करावे व वेळीच नुकसानग्रस्ताना आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांनी एका लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनावर बाळासाहेब भांबळे यांच्यासह शौकत लाला माजी नगरसेवक दलवीर पठाण,शाहेद बेग मिर्झा,इस्माईल पैलवान,शेख जानिमिया,मनोहर डोईफोडे, दत्तराव काळे,पिंटू डोंबे,हकीम लाला,संजय निकाळजे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.