Uncategorized

जिंतूर स्टेट बँकेच्या एलदरी रोड शाखेत ग्राहकांची हेळसांड

वेळोवेळी पैशाचा तुटवडा: वयोवृद्ध खातेदार व पेंशन धारकांना करावी लागते तारेवरची कसरत

बँकेच्या अपुरे जागेत वयोवृद्ध खातेदार व पेंशनर धारकांची कुचंबणा

जिंतूर-गुणीरत्न वाकोडे)—– भारतीय स्टेट बँक येलदरी रोड शाखेचा नुसता बोजवारा उडाला असून, मागील अनेक दिवसांपासून ग्राहकांचे पैसे वेळेवर मिळत नाहीत शाखेत पैशाची टंचाई भासत असल्याने शाखेत ग्राहकांची हेळसांड व कुचंबणाच होत असून पैसे उचलण्यासाठी आलेल्या ग्राहकांना दिवस – दिवस उपाशी ताटकळत बसावे लागत आहे. तर संबंधित अधिकाऱ्यास विचारणा केल्यास ग्राहकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे दिसून येत आहेत.
येलदरी रोडवरील शाखा शेतकऱ्यांशी निगडित शाखा असल्याने या शाखेमध्ये अनेक जिंतूर तालुक्यातील जवळपास ग्रामीण भागातील खेड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात खाते आहेत. तसेच जिंतूर शहरातील मोठाले ,उद्योजक, व्यापारी व पतसंस्था तसेच शासकीय कार्यालयाचे आर्थिक देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात होत असल्याने सदरील बँकेला पतपुरवठा मागील पाच-सहा दिवसापासून कमी होत असल्याने ग्राहकांना आल्या पावली क्यास नसल्यामुळे परत जावे लागत आहे. यामुळे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी बाचाबाची होत आहे. तसेच शाखेमधील कॉन्टर क्रमांक तीनवर सदरील कर्मचारी के.वाय.सी करण्यासाठी चौकशी केली. असता सदरील फॉर्म बाजूच्या कॉन्टरवरून घ्या काय डॉक्युमेंट लागतात ते त्यांनाच विचारा डॉक्युमेंट व फॉर्म भरून दिल्यानंतर पाच दिवसाच्या नंतर के .वाय.सी होईल असे सांगून उडवाउढीचे उत्तरे दिले जात आहेत. यामुळे अनेक नागरिकांचे खाते व ग्रंथालयांचे खाते शासनाचे आलेले अनुदानही के.वाय.सी नसल्याने खात्यावर आलेले अनुदान पडून आहेत. तर खातेदार बँकेत चकरा मारत आहेत.
सध्या उन्हाचा पारा 42 डिग्रीपार पोहोचत असून, शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. सदरील जागा अपुरी असल्याने बसण्याचे व्यवस्था नाही.शाखेतील कर्मचाऱ्याकडून ग्राहकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने ग्राहकांना स्वतःचेच पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची टाळत आहेत .

तरी वरिष्ठांनी संबंधित कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यास ताकीद द्यावी, अशी मागणी बँक ग्राहकांतून होत आहे.
चौकट
मागील चार ते पाच-सहा दिवसापासून आर्थिक तुटवडा असल्याने ग्राहकांना पैसे देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे वरूनच पुरवठा न झाल्यामुळे ही अडचण भासत आहे काही दिवसांमध्ये लवकरच समस्या सुटेल .
हारी मांडवी
शाखा व्यवस्थापक स्टेट बँक येलदरी रोड जिंतूर

चौकट
जिंतूर पोस्ट ऑफिस अंतर्गत 22 ब्रांच पोस्ट ऑफिसला पतपुरवठा करावा लागत आहे.परतू
सदरील मागणी 20 लाखाची केल्यानंतर कधी पाच लाख किंवा दहा लाख दिली जातले जातात. 20 लाख मागणी करून कधीही 20 ला कॅश दिली जात नाही. यामुळे अनेक ग्राहकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहेत.
माऊली नरवाडे
पोस्ट मास्तर जिंतूर

चौकट
शहरात दोन शाखे पैकी या शाखेची नगर पालिकेच्या जागेतील ही शाखा अत्यंत कमी जागेत कित्येक वर्षांपासून कार्यरत आहे.खातेदार बेसुमार वाढलेत पण वाढलेल्या असंख्य खातेदारांच्या सोयीसाठी स्थानिक बँक प्रशासनाने कोणतीही व्यवस्था केलेली दिसून येत नाही विशेषता व पेन्शन धारकांना येथे पैसे काढताना कमालीची करावी लागते बसण्यास अपुरी जागा असल्याने तासनतास वयस्क खातेदार दरवेळी ताटकळत उभे राहतात यांच्या साठी बँक कोणतीही सहानुभूती दाखवत नसल्याने खातेदार कमालीचे वैतागले आहेत.शहरातही चौफेर वाढलेली संख्या पाहता शहरात पुन्हा एसबीआयची तिसरी शाखा असणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button