ग्रामीण सह शहरी भिषण पाणी टंचाई व राशन कार्डाचे प्रश्न निकाली लावा-मा.आ.विजय भांबळे
शक्ती प्रदर्शन करत सत्ताधाऱ्यांचा केला निषेध

जिंतूर:-(गुणीरत्न वाकोडे)-
दि.२३ एप्रिल, जिंतूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील तीव्र पाणी टंचाईवर तात्काळ उपाय योजना करा व राशन कार्ड धारकांचे विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी मा.आ.विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस (श.पं)पक्षाच्या वतीने आज रोजी तहसीलदार यांना लेखी स्वरुपात निवेदन देण्यात आले.
जिंतूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागत उन्हाळा सुरु झाल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक गावात, वाडी, वस्ती व तांड्यावर तसेच शहरातील अनेक प्रभागात दूरदूरवरून पाणी महिलांना डोक्यावर आणावे लागत आहे. भर उन्हात पायाची पायपीट करावी लागत आहे. अनेक ठिकाणी मोडकळीस आलेल्या विहिरीतून पाणी महिलांना, लहान मुलांना दोरीच्या सहाय्याने काढावे लागत आहे. त्यामुळे जीवित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाण्याच्या प्रश्न गंभीर असताना एप्रिल महिना संपत आला असला तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी टंचाई उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील गावात, वाडी, वस्ती व तांड्यावर तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात पाण्याच्या योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात जेणेकरून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. ज्या गावात, वाडी, वस्ती, तांड्यावर व शहरातील प्रभागात पाणी जवळ शक्य नाही तिथे टँकर तात्काळ सुरु करणे. नवीन इंधन विहिरी मंजूर करून तात्काळ त्या घेणे. विहीर, हातपंप अधिग्रहण करणे. जुन्या विहिरी, हातपंप दुरुस्त करणे. पूरक योजना सुरु करणे ई.
तसेच जिंतूर तालुक्यातील राशन कार्ड धारक लाभार्थी यांचे प्रश्न प्रलंबित असून त्याकडे आपल्या कार्यालयाकडून विशेष लक्ष दिल्या जात नसल्याने अनेक लाभार्थी यांना राशन कार्ड दिले नाही त्यामुळे शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी राशनकार्डाची आवश्यकता असून ते राशन कार्ड नसल्याने योजने पासून वंचित राहत आहेत. तसेच अनेक गरीब लाभार्थी यांना धान्य मिळत नाही अनेक लाभार्थी यांचीनावे स्थलांतरीत झाल्याने नाव कमी करण्याचे व नाव समाविष्ट करण्याचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी विविध लाभापासून वंचित राहत आहेत त्यासाठी उपाय योजना तात्काळ करण्यात याव्यात.
ज्या लाभार्थ्यांचे नावे राशन कार्ड यादीत आहेत त्यांना नवीन राशन कार्ड तात्काळ वाटप करण्यात यावेत. अनेक लाभार्थी यांना राशन कार्ड असून देखील राशन (धान्य) पुरवठा केला जात नाही त्यांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून धान्य पुरवठा तात्काळ सुरु करणे. अनेक नवीन नागरिक व विवाहित महिला, व कुटुंबातील सदस्य यांचे नावे राशन कार्ड मध्ये समाविष्ट करणे. तसेच अनेक स्थलांतरीत नागरिक व विवाहित मुलींचे नावे कमी करणे. नावात दुरुस्ती असल्यास तात्काळ नाव दुरुस्त करून देणे ई. मागण्याचे लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी मा.आ.विजय माणिकराव भांबळे, रामराव उबाळे, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, गणेशराव इलग, मधुकर भवाळे, शरदराव अंभूरे, संजय निकाळजे, खयुम कादरी, माउली गायकवाड, प्रभाकर चव्हाण, जगदीश शेंद्रे, प्रकाश शेळके, प्रकाश शेवाळे, दत्तराव काळे, शेख इस्माईल, आहेमद बागबान, कैलास महाराज, मनोहर सातपुते, सचिन राऊत, संजय अंभूरे, सुरज अंभूरे, शौकत लाला, अक्कू लाला, राहुल घुले, माणिक सानप, बबनराव मगर, बाळासाहेब मगर, शंकर जाधव, अविनाश मस्के, सलीम काझी, प्रकाश जाधव, विशाल चोपडे, दत्तराव लाटकर, सदाशिव सरकटे, गजानन काष्टे, माधव घोगरे, संजय शर्मा, दिलीपराव डोईफोडे, नयुम कादरी यांच्यासह तालुक्यातील व शहरतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.