Uncategorized

घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांना एका जातीपुर्ते मर्यादित ठेवू नका–डॉ.यशवंत खडसे

एसटी आगारात 14 एप्रिल जयंती उत्साहात साजरी:उदघाटक डॉ.खडसे यांचा केला यथोचित सत्कार

जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)—भारत देशात विविध जाती,पंथ,धर्म मानणारे लोक राहतात. अश्या सर्वांचा अभ्यासपूर्ण विचार करून तल्लख,अफाट कुशाग्र बुद्धिमत्तेने परिपूर्ण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेला पूर्णरुप देतांना देशातील कोण्या एका जातीचा,पंथाचा किंवा धर्माचा विचार केला नाही.म्हणून विशेषतःआपण बाबासाहेबांना एका जातीपुर्ते मर्यादित ठेवू नका असे विचार साहित्यिक डॉ.यशवंत खडसे यांनी व्यक्त केले.ते जिंतूर एसटी आगारातील आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडर यांच्या 134 व्या जयंती निमित्त ते कार्यक्रमच्या उदघाटनपार भाषणात बोलत होते.
त्यांनी पुढे असेही सांगितले की आपल्या भारतात लोकशाही पद्धतीत असंख्य जातीधर्म,पंथ असतांना सुद्धा लोक गुणागोविंदाने राहतात त्याचे मूळ आणि प्रमुख कारण म्हणजे जगातील सर्व देशापेक्षा उत्कृष्ट असलेली आपली राज्यघटना आणि ती घटना बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेत लिहिली आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या सदस्यांची पहिली बैठक झाली होती.घटना पूर्ण करण्यास बाबासाहेबांना दोन वर्ष 11 महिने 18 दिवस असा कालावधी लागला. 26 नोव्हेंबर रोजी राज्यघटनेचा मसुदा तयार झाला.26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्विकारण्यात आली. आणि 26 जानेवारी 1950 ला अमलात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांच्या जीवनात पाण्यासाठी महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन, धम्मचक्र प्रवर्तन दिन या विशेष घटनेवर डॉ.खडसे यांनी प्रकाश टाकला.त्या वेळी कित्येक धर्मगुरूंनी बाबासाहेबांनी आपला धर्म स्वीकारावा म्हणून गळ घातली होती.पण बाबासाहेबांनी समता,बंधुता व शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धाच्या मार्गाचा अवलंब करत बुद्ध धर्म स्वीकारला.हे क्रांतिकार्य ऐतिहासिक पाऊल उचल्याचा त्यांनी उजाळा दिला.
मंचावर उदघाटक म्हणून डॉ.यशवंत खडसे,तर अध्यक्ष म्हणून स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे,सौ.सुनीता पाटील, विकास अण्णा मोरे,प्रीती लांडगे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात मान्यवरास संविधानाच्या प्रति देऊन सन्मानित करण्यात आले.विशेषतः मंचावर उदघाटक डॉ.यशवंत खडसे व स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणीरत्न वाकोडे यांनी केले.सदरील कार्यक्रमास बहुसंख्य चालक,वाहक व सहाय्यक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button