पाणी हेच जीवन त्याचा संचय करा–सभापती गंगाधर बोर्डीकर
जिंतूर बस स्थानकावर पाणपोईचे थाटात उद्घाटन

पाणी हे जीवन आहे त्याचा संचय करा – सभापती गंगाधर बोर्डीकर
जिंतूर बसस्थानकावर पाणपोईचे लोकार्पण
जिंतूर—(गुणीरत्न वाकोडे )–यावर्षी तालुक्यात पुरेसा पाऊस पडला तरी वाढत्या उष्णतेमुळे पाणवठे, विहिरी, जलकुंभ यांची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करा अशा आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी केले.
स्व. आयोध्याबाई रामनारायण तोष्णीवाल चारिटेबल ट्रस्टच्या वतीने रमन तोष्णीवाल, पंकज तोष्णीवाल, सचिन तोष्णीवाल यांच्या पुढाकारातून दरवर्षी बस स्थानकावर पाणपोईचे आयोजन करण्यात येत असते. ता.१६ रोजी शितल जल केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी बोर्डीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, भाजपा तालुकाध्यक्ष गोविंद थिटे,ज्येष्ठविधीज्ञ मनोज सारडा,बाजार समिती संचालक सचिन देवकर, गोविंद पोरवाल, आगर प्रमुख आनंद चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर, एम. ए. माजिद,संदीप भांबळे, आदी उपस्थित होते. यावेळी बोर्डीकर म्हणाले की, पाणी हे जीवन आहे. निसर्ग आणि जीवनसृष्टी ही पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. येत्या आठवड्याभरात नागरिकांना चोवीस तास पाणी उपलब्ध व्हावे म्हणून नगरपालिकेच्या वतीने जिंतूर बस स्थानकात नळ योजना सुरू करू असेआश्वासन त्यांनी दिले. यावेळी तोष्णीवाल चारिटेबल ट्रस्टच्या वतीने केलेल्या उपक्रमाची त्यांनी कौतुक केले. प्रास्ताविकात ब्रिजगोपाल तोष्णीवाल म्हणाले की, मागील १४ वर्षापासून स्व. अयोध्याबाई तोष्णीवाल चॅरिटेबल चर्चा वतीने हा उपक्रम राबवण्यात येत असून या ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत दरवर्षी नेत्र तपासणी शिबिर, अपंगांसाठी साहित्य वाटप शिबिर अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच अशी उपक्रम राबवत असते. यावेळी आगार प्रमुख चव्हाण, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सुनील तोष्णीवाल, ज्येष्ठ पत्रकार निहाल अहमद,मंचक देशमुख, गुणीरत्न वाकोडे, शिराज सिद्दिकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार शेख शकील तर आभार प्रदर्शन रमण तोष्णीवाल यांनी केले.