ग्राहक जागरण पंधरवाडा साजरा करा–अखिल भारतीय पंचायतीची मागणी

जिंतूर—( गुणीरत्न वाकोडे)
जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागरण पंधरवाडा म्हणून साजरा करण्याची मागणी जिंतूरचे तहसीलदार यांच्याकडे 13 मार्च रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे .
जिंतूर तालुक्यातील सर्व सभासदांच्या वतीने दरवर्षी 15 मार्च ते 30 मार्च 2025 पर्यंत ग्राहक जागरण पंधरवाडा म्हणून साजरा करण्यासाठी अनेक महाविद्यालयात, शाळा ,कार्यालय, सामाजिक संस्था इत्यादी कडे ग्राहक दिनानिमित्त जनजागृती केली जात आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध योजना ग्राहकांना आवश्यक असलेली सर्व माहिती या गोष्टीचा समावेश असलेले माहितीपत्रक कॉलेज, शाळा, गाव, वस्ती ग्रामीण भागातील छोटी खेडी अशा सर्व ठिकाणी ग्राहक जागरण्याचे कार्य करण्यात यावे. यासाठी निबंध स्पर्धा, महिला मंडळ, विविध स्पर्धा, शेतकरी मेळावे,या उपकर्माद्वारे व्यापक जनसंपर्क करून ग्राहक जागरणाचे कार्य करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना द्यावा. यासाठी निवेदन देण्यात आली आहेत.
या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष गुलाबराव शिंदे, तालुका अध्यक्ष मंचक देशमुख, शहराध्यक्ष दिलीप देवकर, उपाध्यक्ष भागवत चव्हाण ,सहसचिव महेश देशमुख उपाध्यक्ष प्रल्हाद टाकरस यास अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.